अशा व्यापक आचारविचारांच्या संताची अवहेलना करायची आणि धर्माच्या नावाखाली देवाची पूजा करायची, हा खरा धर्म नव्हे, असं तुकारामांना वाटत असे, ते म्हणतात,
१२
संताचा अतिक्रम | देवपूजा तो अधर्म ||१||
येती दगड तैसे वरी | मंत्रपुष्पे देवा शिरीं ||२||
अतीतासि गाळी | देवा नैवेद्यासी पोळी ||३||
तुका म्हणे देवा | ताडण भेदकांची सेवा ||४||
(अभंग क्र. २७९)
संताचं उल्लंघन करुन देवपूजा करणं, हा अधर्म होय. अशी पूजा करताना म्हटलेले मंत्र, वाहिलेली फुलं ही दगड पडावेत तसे देवाच्या मस्तकावर येतात. आपल्याकडं आलेल्या अतिथीला शिवी द्यायची आणि नैवेद्याची पोळी घेऊन जायचं, हाही तुकारामांना अधर्म वाटतो. माणसामाणसांत भेदभाव करणाऱ्यांनी केलेली देवाची सेवा ही देवाच्या दृष्टीनं मारहाण असते. कारण, खरा देव मूर्ती वगैरेंमधे नसतो, तर सज्जनांच्या ठायी असतो.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment