Wednesday, 21 December 2016

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २१)

      ज्या लोकांच्या मनात इतरांविषयी कळवळा असतो आणि त्यांचं हित व्हावं अशी उत्कट इच्छा असते, ते लोक इतरांना जगण्याची योग्य वाट दाखवितात. असं करण्यामागं त्यांचा काही स्वार्थ नसतो. ते केवळ करुणेपोटीच लोकांना उपदेश करत असतात. अशा प्रकारच्या उपदेशाविषयी तुकारामांनी अनेक अभंग लिहिले आहेत. एका अभंगात ते म्हणतात :

२१
उपकारासाटी बोलो हे उपाय | येणेविण काय आम्हा चाड ? ||१||
बुडता हे जन न देखवे डोळां | येतो कळवळा म्हणउनि ||२||
तुका म्हणे माझे देखतिल डोळे | भोग देते वेळे येईल कळो ||३||
                    (अभंग क्र. ९४८)

     तुकाराम महाराज म्हणतात : आम्ही उपकार करण्याच्या इच्छेनं हे उपाय सांगत आहोत. खरं रहायचं, तर याविना आमचं काय अडलं आहे ? लोक बुडत आहेत, त्यांचं जीवन दुःखान्त उद्ध्वस्त होत आहे, ते मला डोळ्यांनी बघवत नाही, म्हणून माझ्या मनात कळवळा निर्माण होत आहे. यांच्यावर दुःख भोगण्याची वेळ येईल, तेव्हा त्यांना हे कळेल. त्या वेळीही माझे डोळे त्यांच्याकडं कळवळ्यानंच पाहतील

(संग्राहक : संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment