आपल्या अंतःकरणातील करुणेमुळं तुकाराम नेहमी दुःखी-कष्टी जीवांना मदत करण्याचा विचार करीत असत. लोकांनाही ते याच अर्थाचा उपदेश करीत असत. एका अभंगात ते म्हणतात,
३०
आर्तभूतां द्यावे दान ! खरे पुण्य त्या नावें !!१!!
होणार ते सुखें घडो ! लाभ जोडो महाबुद्धि !!२!!
सत्य संकल्पा च साटी ! उजळा पोटीं रविबिंब !!३!!
तुका म्हणे मनीं वाव ! शुद्ध भाव राखावा !!४!!
(अभंग क्र. ३६५२)
दुःखानं कासावीस झालेल्या प्राण्यांना दान द्यावं, मदत करावी, या कृतीलाच खरं म्हणजे पुण्य हे नाव आहे. आपण मदत केल्यानंतर जे काही घडायचं असेल, ते खुशाल घडो. आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. आपल्या परीनं आपल्याला शक्य आहे ते करावं, म्हणजे झालं. आपल्या महान बुद्धीनं, आपल्या श्रेष्ठ विवेकानं हाच लाभ करून घ्यावा, हे उत्तम. दुःखी-कष्टी लोकांना मदत करणं, हेच जीवनातील खरं सत्य आणि आपण त्या सत्याचाच संकल्प करावा. सूर्यबिंब उगवल्यानंतर जसं सगळं जग उजळून निघतं, तसं या संकल्पानं आपलं अंतःकरण उजळून निघावं. शुद्ध भावना जपून ठेवता यावी, यासाठी आपल्या मनामधे जागा करून घ्यावी, आपल्या अंतर्यामी शुद्ध भावनेला वाव द्यावा.
३०
आर्तभूतां द्यावे दान ! खरे पुण्य त्या नावें !!१!!
होणार ते सुखें घडो ! लाभ जोडो महाबुद्धि !!२!!
सत्य संकल्पा च साटी ! उजळा पोटीं रविबिंब !!३!!
तुका म्हणे मनीं वाव ! शुद्ध भाव राखावा !!४!!
(अभंग क्र. ३६५२)
दुःखानं कासावीस झालेल्या प्राण्यांना दान द्यावं, मदत करावी, या कृतीलाच खरं म्हणजे पुण्य हे नाव आहे. आपण मदत केल्यानंतर जे काही घडायचं असेल, ते खुशाल घडो. आपण त्याचा विचार करण्याचं कारण नाही. आपल्या परीनं आपल्याला शक्य आहे ते करावं, म्हणजे झालं. आपल्या महान बुद्धीनं, आपल्या श्रेष्ठ विवेकानं हाच लाभ करून घ्यावा, हे उत्तम. दुःखी-कष्टी लोकांना मदत करणं, हेच जीवनातील खरं सत्य आणि आपण त्या सत्याचाच संकल्प करावा. सूर्यबिंब उगवल्यानंतर जसं सगळं जग उजळून निघतं, तसं या संकल्पानं आपलं अंतःकरण उजळून निघावं. शुद्ध भावना जपून ठेवता यावी, यासाठी आपल्या मनामधे जागा करून घ्यावी, आपल्या अंतर्यामी शुद्ध भावनेला वाव द्यावा.
(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८
No comments:
Post a Comment