Thursday, 5 January 2017

संत तुकारामांचे अभंगशतक (हितासाठी उपदेश २८)

लोकांच्या हितासाठीच आपण त्यांना उपदेश करतो, हे स्पष्ट करताना त्यांनी एका अभंगात म्हटलं आहे,

२८
भूतीं भगवंत ! हा तो जाणतो संकेत !!१!!
भारी मोकलितो बाण ! ज्याचा त्यासी कळे गुण !!२!!
करावा उपदेश ! निवडोनि तरि दोष !!३!!
तुका म्हणे वाटे ! चुकता आडराने काटे !!४!!
           (अभंग क्र. ८३३)

सर्व प्राण्यांमधे भगवंत असतो, हा संकेत तर मी जाणतो, असं ते म्हणतात. इतरांनीही हे जाणावं, ही त्यांची उत्कट इच्छा होती. म्हणूनच ते त्या अर्थाचा उपदेश करीत असत. हा उपदेश करणारे शब्दांचे जबरदस्त बाण मी सोडतो आणि ज्याला ते कळायला हवं त्याला ते कळतं, असं ते म्हणतात. ज्या गोष्टीचा उपदेश करायचा, त्या गोष्टीत काही दोष असू नयेत याची काळजी घेऊन उपदेश करावा, असं तत्त्व त्यांनी सांगितलं आहे. जीवनाचा प्रवास करताना माणूस वाट चुकून आडरानाला गेला, तर त्याला काट्यांचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. म्हणूनच माणसानं वाटचाल करताना आवश्यक ती काळजी घ्यावी.


(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment