Monday, 29 August 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( शेती ५७ )

प्रत्येक काम वेळेवर केलं पाहिजे, या बाबतीत तुकाराम फार आग्रही होते. कोणत्या वेळी कोणतं काम करावं आणि ते केव्हा थांबवावं, याचं भान प्रत्येकानं ठेवलं पाहिजे, असा त्यांचा उपदेश होता. ते म्हणतात,

५७ 
शिजल्यावरी जाळ ।  वाया जायाचे ते मूळ ॥१॥
 ऐसा वारावा तो श्रम । अतिशयी नाही काम ॥२॥
 सांभाळावे वर्म । उचिताच्या काळे धर्म ॥३॥
तुका म्हणे कळे। ऐसे कारणाचे वेळे ॥४॥
 (अ.क्र. ३२२१)

पदार्थ शिवल्यानंतर जाळ चालू ठेवणं, ही गोष्ट केलेलं सर्व काही वाया घालवण्याला कारणीभूत होते. अशा प्रकारचे वाया जाणारे श्रम टाळावेत. केलेलं काम निष्फळ बनविणारा अतिरेक काही कामाचा नाही. हे यशस्वी जीवनाचं रहस्य सांभाळावं. योग्य वेळी योग्य गोष्ट करणं, हा खरा धर्म होय, खरं कर्तव्य होय. काम करण्याच्या वेळी हे नीट कळतं. अर्थात, ज्यांना ते कळतं, त्यांचंच जीवन सफल होतं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment