Friday, 2 September 2022

संत तुकारामांचे अभंगशतक ( सत्य ७१ )

                ‌‌     सत्य ७१

माणसानं जीवनाच्या प्रवासात निर्भेळ सत्य मिळवावं, हे सांगताना ते म्हणतात, 

७१ 
थोडे परी निरे । अविट ते घ्यावे खरे ॥ १॥
घ्यावे जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥२॥
चित्त ठेवी ग्वाही । आणिकांशी चाड नाही ॥३॥
आपले ते हित फार । तुका म्हणे खरे सार ॥४॥

 (अभंग. क्र.५७८)

माणसानं जे विशुद्ध आणि खरं असेल, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी त्याची गोडी अबीट असते. तेच हितकारक असतं. ज्यामुळं नुकसान होणार नाही, ते घ्यावं. ते थोडं असलं, तरी आपोआप वाढत जातं. एका बीजाच्या पोटी वाढता वाढता असंख्य बीजं निर्माण होतात. सत्यही असंच वाढत जातं. आपण जे स्वीकारतो, ते सत्य आहे अशी आपल्या मनानं ग्वाही देणं, हे खरं महत्त्वाचं असतं. इतर लोक काय म्हणतात, याची पर्वा करण्याची गरज नसते. सारभूत सत्य प्राप्त होणं, हे आपलं खरं हित असतं. आपण त्याच्यावरच लक्ष केंद्रित करावं.

डॉ. आ. ह. साळुंखे सर

(संग्राहक: संजय दत्तात्रय सोमवंशी पाटील)
९४२२३४५३६८

No comments:

Post a Comment