शिवधर्म संसदेचे निवेदन: -
संत तुकारामांचे अभंगशतक ही संग्रहमालिका ...
मानवाची प्रगती व कल्याण साधण्यासाठी अनेक महामानवांनी आपले आयुष्य वेचले आहे. संत तुकाराम महाराज हे त्यांच्यापैकी एक होत. त्यांचे विचार त्यांच्या अभंगातून प्रकट झालेले आहेत. जीवनाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मार्गदर्शक असे हे विचार सार्वकालिक आहेत. या अभंगशतकाद्वारे त्यांच्या विचारांचे स्मरण करुन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करु या...
हे सर्व अभंग मानवी मनाला स्वतंत्र आणि प्रसन्न, विनम्र आणि तरीही उन्नत करणारे आहेत. कीर्तन आणि भजन यांच्या माध्यमातूनही हे सर्वसामान्य पोहचावेत व तसे झाल्यास आपल्या समाजाचा निकोप आणि सर्वांगीण विकासास नक्की हातभार लागेल. या अभंगशतकातील अभंगांची निवड आणि त्याचे विवरण डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले आहे.
तुकोबांच्या अभंगशतकाची एक संग्रहमालिका आपण आजपासून सुरु करत आहोत...
शिवतत्त्वाला नमन असो |
जिजाऊजननीला नमन असो |
संत तुकाराम महाराजांना नमन असो |
माणसानं आयुष्यात संत तुकारामांचा निदान एक तरी अभंग ऐकावा, म्हणावा आणि अनुभवावा, म्हणजे नीट कसं जगावं आणि आनंदरसामधे भिजून कसं निघावं, हे कळल्याखेरीज रहात नाही...!
No comments:
Post a Comment